नागपूर – संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
#WinterSession | हिवाळी अधिवेशन होणार वादळी; शिंदे-फडणवीस सरकारची लागणार कसोटी
नंदनवन भागातील ग्रेट नाग रोडवरील संत जगनाडे चौकात संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
#WinterSession | हिवाळी अधिवेशन होणार वादळी; शिंदे-फडणवीस सरकारची लागणार कसोटी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संतांच्या आध्यात्मिक विचारातून मानवी जीवन कसे बदलू शकते हे दिसून येते. ते केवळ संतच नव्हते तर समाजसुधारक होते. समाजातील चाली-रिती बदलवून समाजातील विषमता दूर करून समाज पुढे गेला पाहिजे. संतांनी दिलेला विचार हा शाश्वत आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी संतांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संत जगनाडे महाराजांच्या सौदुंबरे या जन्मभूमी व कर्मभूमीचा विकास करण्यासाठी 60 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.