Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. अशात सत्तेत असलेल्या भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजप पक्षातील हायप्रोफाईल नेत्यांसह कलाकारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्रतील भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव या यादीत नसल्यामुळे आता विरोधकांडून भाजप पक्षांवर निशाणा साधण्यात येत आहे. अशात उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
Lok Sabha Election 2024 । संजय राऊत म्हणाले
‘भाजपाबरोबरच्या दोन कचऱ्याच्या डंपरमुळे त्यांच्याहातून महाराष्ट्र निसटत आहे. याच कारणामुळे भाजपाचे नेते आता नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून निवडणूक लढविण्यास सांगत आहेत. जेणेकरून मोदी जर महाराष्ट्रातून लढले तर भाजपाला दोन-चार जागा मिळू शकतील.’
संजय राऊत यांनी मोठा दावा केला की,’नितीन गडकरींचे तिकीट कापून, त्यांचा काटा काढून नागपूर किंवा पुण्यातून लढण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन ४० हून अधिक जागा जिंकत आहे. म्हणून मोदींना महाराष्ट्रात आणून निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे’ असेही ते म्हणाले आहे.
हेही वाचा
तुकोबांचा अभंग वाचत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला,’गाढवाला चंदन लावलं तरीही ते उकिरड्यावर…’
निवडणुकानंतर पंतप्रधान मोदी सरकार भारतातच संविधान बदलणार ? रामदास आठवले म्हणाले,’…बदलणं!’