जालना – पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात सभा घेत आहेत. प्रत्येक टप्प्यात त्यांना महाराष्ट्रात यावे लागत असून हाच मराठा समाजाचा विजय असल्याचा दावा करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
मरोन जरांगे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहे.
त्यांचा विचार करा. जो सगे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत.
मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. इथच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागत आहे. म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.