नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर सध्या सिंगापूरमध्ये उपचार होते. लालू प्रसाद यादव यांच्या मुलीनेच त्यांना किडनी दिल्यानंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर लालूप्रसाद यादव हे आज भारतात परत येणार आहेत. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीच ही माहिती ट्विट करून दिली आहे. तसेच रोहिणी यांनी एक खास आवाहनही केले आहे.
११ फेब्रुवारीला बाबा सिंगापूरहून भारतात येत आहेत. ‘बाबा आता बरे झाले आहेत, तुम्ही सगळ्यांनी बाबांची काळजी घ्या’ या आशयाचे ट्विट रोहिणी आचार्य यांनी केले आहे. लालूप्रसाद यादव यांचे किडणी ट्रांसप्लांट ५ डिसेंबर २०२२ ला करण्यात आले होते. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीच आपले वडील लालूप्रसाद यादव यांना किडणी दान केली आहे. लालूप्रसाद यादव यांना सात मुली आहेत आणि दोन मुलं आहेत. यापैकी रोहिणी या दुसऱ्या क्रमांकाच्या कन्या आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या मुलीने हे सांगितले होते की मी मरणोत्तर अवयव दान केले आहे. ऑर्गन डोनेशन करण्यात काहीही गैर नाही. माझ्या वडिलांना किडणीची गरज होती त्यामुळे मी त्यांना किडणी दान केली.
रोहिणी आचार्य यांनी एक ट्विट केले असून यात ,’तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की, आपले सगळ्यांचे आदरणीय नेते लालूप्रसाद यादव हे ११ तारखेला सिंगापूरहून भारतात परतत आहेत. मी मुलगी म्हणून माझं कर्तव्य पार पाडते आहे. माझ्या बाबांना चांगलं करून तुमच्याकडे पाठवते आहे आता त्यांची काळजी घ्या या आशयाचं एक ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे. एवढंच नाही तर माझ्या वडिलांना जेव्हा भेटायला याल तेव्हा काळजी घ्या. चेहऱ्यावर मास्क जरूर लावा असं आवाहनही रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.
आप सबसे एक जरूरी बात कहनी है. यह जरूरी बात हम सबों के नेता आदरणीय लालू जी के स्वास्थ्य को लेकर है.
11 फरवरी को पापा सिंगापुर से भारत जा रहे हैं.
मैं एक बेटी के तौर पर अपना फर्ज अदा कर रही हूँ. पापा को स्वस्थ्य कर आप सब के बीच भेज रही हूँ..
अब आप लोग पापा का ख्याल रखियेगा. pic.twitter.com/GcVNV1Emly
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) February 10, 2023
रोहिणी आचार्य यांनी एका मुलाखतीत,”आपण पाहतो की ह्युमन ट्रॅफिकिंग होतं. निष्पाप मुलं, मुली यांना मारलं जातं, त्यांचे अवयव काढले जातात, ते विकले जातात. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्या थांबल्या पाहिजेत. दानाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं पाहिजे. दान करण्यापेक्षा मोठी गोष्ट काहीही नाही. तुम्ही कितीही शिका पण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करू शकला नाहीत तर तुम्ही एक चांगले नागरिक कसे होणार? असे म्हटले होते. आता लालूप्रसाद यादव किडणी ट्रान्सप्लांट नंतर पुन्हा एकदा भारतात परतत आहेत.