शिर्डी : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती, म्हणून ते पळून गेले या भितीने या डरपोक लोकांनी सरकार पाडले, असा आरोप उबाठा गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अकोले येथील प्रचारासाठी जाण्यासाठी खा. संजय राऊत हे शिर्डी विमानतळावर आल्यानंतर बोलत होते.या देशात नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री केजरीवाल, सोरेन यांना अटक केली. त्यामुळे ज्यांची नावे मुख्यमंत्री घेत आहेत, ते फडणविस, लाड , महाजन यांच्यावरील गुन्हयांची यादी सांगा. त्यांचा तपास का थांबला हे सांगा.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पोलिसांकरवी फोन बेकायदेशीरपणे टॅप केले. ते सत्तेवर येताच याचा सर्व तपास थांबवला. प्रविण दरेकर, गिरीश महाजन यांची चौकशी का थांबवली ? ते कायद्याच्या वर आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करून राऊत म्हणाले, आम्हाला अटकेच्या धमक्या देता, तुम्ही काय ढगातून पडला आहात का ? कायदा वेगळा आहे का ? आम्ही तुम्हाला संविधान बदलू देणार नाही, असे ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री आमच्या मागे मागे धावत येता आहेत. आम्ही काय करतोय हे बघायला, असा टोला संंजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.आतापर्यंत झालेल्या १३ पैकी १० जागा आम्ही जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.