नवी दिल्ली – भारत-चीन सीमा वादावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जर आम्ही (काँग्रेस) सत्तेत असतो, तर चीनला देशाबाहेर काढायला १५ मिनिटेही लागली नसती. चीनी सैन्याला भारतीय सैन्याने १०० किमी दूर केले असते, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.
हरियाणामध्ये कृषी विधेयकाच्या एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले कि, संपूर्ण जगात एकच देश आहे, ज्या देशामध्ये दुसर्या देशाच्या सैन्याने घुसखोरी केली आहे आणि कोणीही भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता.
पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, पण त्यांना देशात काय घडत आहे याच्याशी देणेघेणे नाही. ते केवळ आपली प्रतिमा सुधारत आहेत. मग हे असे कसले देशभक्त आहेत?, अशी टीका त्यांनी केली आहे.
सरकरने आज मीडिया आणि अनेक संस्थांना आपल्या ताब्यात घेतले आहे. माध्यमांना स्वातंत्र्यता दिल्यास हे सरकार फार काळ टिकणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.