अकोले -आशा कर्मचाऱ्यांना दिलेली मानधन वाढ तुटपुंजी आहे. त्यांना किमान 10 हजार रुपये वेतन द्या, अशी मागणी सिटू संलग्न आशा कर्मचारी संघटनेने केली आहे.
आशा कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची केलेली तयारी पाहून राज्य सरकारने आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात किरकोळ वाढ केली. मात्र आशा कर्मचाऱ्यांवर टाकलेले कामाचे स्वरूप पाहता दिलेली ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचे संघटनेचे मेहबूब सय्यद, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, किसान सभेचे डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे यांनी म्हटले आहे.