मुंबई – लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडण्यापूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील संथगतीने झालेल्या मतदानावर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला होता.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे. यात काही वादग्रस्त आढळल्यास निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.