नवीदिल्ली – काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. पक्ष सोडल्यानंतर झालेल्या टीकेवर आता आझाद यांनी भाष्य केलं आहे. घरच्यांनीच मला घर सोडायला भाग पडल्याचा आरोप आझाद यांनी केला. तसेच काँग्रेसवर थेट निशाणा साधत काँग्रेसकडे डॉक्टर नाही तर कंपाउंडर असल्याचे आझाद यांनी यावेळी म्हंटले.
जयराम रमेश यांचे नाव न घेता शाब्दिक हल्ला चढवत आझाद म्हणाले,”सर्वात आधी त्यांनी त्यांचा डीएनए तपासावा, ते कोणत्या पक्षात आहेत, नेमका त्यांचा डीएनए कोणता आहे हे तपासावे. तसेच आझाद यांनी यायला पंतप्रधान मोदींचे कौतुक देखील केले. आझाद यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
ट्विट करून पोस्ट मिळवणाऱ्यांनी आरोप केले तर त्याचे आम्हाला वाईट वाटते. काँग्रेसला वाचवण्यासाठी औषधाची (दवा) गरज नसून दुआची गरज आहे आणि त्यांच्याकडे डॉक्टर नसून कंपाउंडर आहे असा मार्मिक टोला देखील आझाद यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.