नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाचे पडसाद देशाच्या राजधानीत उमटले. त्या प्रकरणाचा आणि प्रकरणाच्या हाताळणीवरून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध देशभरातून विरोध करण्यात आला.
#Hathras case: District administration convinced parents of deceased to cremate her at night to avoid large scale violence in the morning, UP govt in affidavit to SC; cites intelligence inputs of possible assembly of lakhs of protesters & issue being given caste/communal colour https://t.co/9CshGV3x0p pic.twitter.com/twkJ6yqeyc
— ANI (@ANI) October 6, 2020
अशातच हाथरस प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस घटनेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी वेळी उत्तर प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे. कुटुंबाच्या संमतीने व उपस्थितीत पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याची योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकारनं न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हटलं आहे की,’बलात्कार व हत्येचा घटनेची चौकशी तसेच जात संघर्ष निर्माण करण्याचा कट असल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हाचा तपास हस्तांतरित करण्याची विनंती केंद्राला केली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘विचित्र परिस्थिती निर्माण झाल्यानं जिल्हा प्रशासनाला पीडितेवर रात्री अंत्यसंस्कार करण्याचं पाऊल उचलावं लागलं. मात्र, पीडितेवर तिच्या कुटुंबाच्या संमतीने आणि उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले.’
दरम्यान,सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यांची मुलगी माझ्या मुलीच्या जागी असती तर अशा रात्रीच्या भयावह गडद काळोखात त्यांनी अंत्यसंस्कार केले असते का? असा संतप्त सवाल हाथरसमध्ये झालेल्या कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी केला आहे. या युवतीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार उरकण्यासाठी पोलिसांनी बळजबरी केल्याचा आरोप पीडितेचे कुटुंबीय करत आहेत.