देशभरातील 90 लाखांपैकी केवळ 5 टक्के ट्रक रस्त्यावर
पुणे – सध्या देशभरामध्ये लॉकडाऊनमुळे मालवाहतूक थंडावली आहे. त्यामुळे विविध बाबींच्या तुटवड्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कॉंग्रेसने म्हटले आहे.
देशातील 90 लाखांपैकी केवळ 5 टक्के ट्रक सध्या रस्त्यावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर या ट्रकमधील माल उतरविण्यासाठी कामगार मिळत नाहीत. यासंदर्भात गृहमंत्रालयाने तपशिलात निवेदन देऊनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. कारण काही ट्रक चालकांनी लॉकडाऊननंतर ट्रक आहे तिथेच सोडून आपले गाव गाठले आहे.