नवी दिल्ली – चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरी बद्दल पंतप्रधानांनी मौन का बाळगले आहे असा प्रश्न आज ट्विटरवर उपस्थित करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला पुन्हा एकदा या विषयावरून कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रतिसाद देताना आंतरराष्ट्रीय विषयावर ट्विटरवर प्रश्न विचारात नसतात असा सल्ला भाजप नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे की, चीन सारख्या विषयावर ट्विटरवर प्रश्न विचारणे योग्य नाही. हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांनी बालाकोट हल्ल्याच्या संबंधात त्या हल्ल्याच्या खरेपणाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता असा संदर्भही रविशंकर प्रसाद यांनी आपल्या ट्विटरवरील प्रत्युत्तरात दिला आहे.