मुंबई – ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला. या पुरामुळे बरीच गावं पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले. तत्कालीन राज्य सरकारपासून सर्वसामान्य नागरिक आणि कलाकार अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता.
दरम्यान, या मदत कार्यात आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे बॉलिवूडचा दिलदार भाईजान म्हणजेच अभिनेता ‘सलमान खान’. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘खिद्रापूर’ गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमानने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थानं मिळून हे गाव दत्तक घेतले जाणार आहे.