Pm Narendra Modi In Kolhapur – देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. दोन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूरात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीसह काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच राम मंदिराला विरोध केला आहे. आज शिवसेना त्यांच्यासोबतच जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावून बसली आहे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप वाईट वाटले असते. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेस 370 हटवणार असल्याचे सांगत आहे. हे जनतेला मान्य आहे का? तुम्ही जनता हा निर्णय मागे घेऊ देणार आहात का?, मोदींच्या निर्णयाला विरोध करण्याची कुणाची हिंमत आहे का?’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, जगात भारी कोल्हापुरी… फिर एक बार मोदी सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांनी यावेळी गरिबो की सरकार, मोदी सरकार असे नारेही दिले.
पीएम मोदी यांच्या सभेतील महत्वाचे मुद्दे –
– राम मंदिराला आळा घालणाऱ्या काँग्रेसने राम मंदिराचा बहिष्कार केला.
– काँग्रेसचे सर्व पाप माफ केले आणि ट्रस्टने प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिले. तरीदेखील त्यांनी या निमंत्रणाचा अवमान केला.
– सनातन धर्माला डीएमके पार्टी विरोध करते. त्यांचा काही लोक सन्मान करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंना किती वाईट वाटले असते.
– नकली शिवसेना या सर्व एजंटांसोबत मिळून काम करत आहेत. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना या सर्वांचे खूप दुःख झाले असते.
– काँग्रेसचे राजपूत्र तुमच्या संपत्ती, महिलांचे दागिने आणि सोन्याची चौकशी करणार आहे.
– कांग्रेसने ही तुमची संपत्ती या देशावर ज्यांचा हक्क आहे, त्यांना वाटून देणार आहे.
– काँग्रेसने घोषणा केली आहे की, तुमची आयुष्यभर जेवढी संपत्ती जमा करणार, तुम्ही जेवढी कमाई करणार, ते तुम्ही तुमच्या मुलांना वारसाला देऊ शकत नाही.
– तुमच्या कमाईतला अर्धा हिस्सा काँग्रेस वसूल करण्याच्या विचारात आहे.
– तुम्ही जमा केलेली जमापुंजी तुम्ही काँग्रेसला लुटू देणार आहेत का?
– नेहमीच गरीबांचा अपमान करणारी काँंग्रेस आज बाबासाहेबांचे गुणगान गात आहे.
– काँग्रेस देशात कर्नाटक मॉडेल अवंलबविण्याच्या विचारात आहे.
– महिलांची सुरक्षा आणि महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी ही मोदींची गॅरंटी आहे.
– आम्ही त्यांना संधी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच दहा कोटी महिला या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
– तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे ध्येय आहे. महिला आमच्या पाठीशी उभ्या आहेत. हे पाहून काँग्रेस हतबल झाली आहे.
– उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध होतील. त्यासाठी पुढे येथे वंदे भारतचीही सुविधा उपलब्ध करणार
– अंबाबाईच्या दर्शनाला येथे येणाऱ्या भाविकांची गर्दीही वाढणार आहे. तसेच, या भागात रस्ते आणि वाहतुकीलाही चालना देण्याचं काम आम्ही करणार आहोत.
– घर घर जाऊन तुम्ही सांगा की, मोदी कोल्हापुरात आले आणि त्यांना माझा नमस्कार सांगा. त्यांचा आशीर्वाद मला मिळायला हवा आहे.
– भारतच्या विकासासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे मोदी म्हणाले.