Lok Sabha Election 2024| देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सूरु झाली. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे. तर येत्या शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांत ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यात किती उमेदवारी अर्ज दाखल Lok Sabha Election 2024|
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण ५२२ उमेदवारांचे अर्ज आले होते. यापैकी ३१७ उर्ज वैध ठरले आहेत. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज २२ एप्रिल रोजी संपणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघात २१, बारामती लोकसभा मतदारसंघात ४६ , उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ३५, लातूर लोकसभा मतदारसंघात ३१, सोलापूर लोकसभा मतदारसंघात ३२.
माढा लोकसभा मतदारसंघात ३८, सांगली लोकसभा मतदारसंघात २५, सातारा लोकसभा मतदार संघात २१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ९, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २७ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३२ उमेदवारांचे असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे सर्वांत जास्त ४६ अर्ज बारामती मतदारसंघात तर सर्वांत कमी ९ अर्ज रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात वैध ठरले आहेत. Lok Sabha Election 2024|
दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. Lok Sabha Election 2024|
तर पहिल्या टप्यात नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमुर, भंडारा- गोंदिया आणि चंद्रपूर या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात आली आहे.
हेही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या संपत्तीवरील टीकेवर जितेंद्र आव्हाड संतापले ; म्हणाले, “काँग्रेसच्या नावावर…”