नवी दिल्ली – देशभरातील एटीएममधूल हजार रूपयांच्या नोटा हटवण्यात येणार असल्याच्या चर्चां गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. देशातील एटीएममधून कमी होत असलेल्या हजार रूपयांच्या नोटांबाबत आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकी दरम्यान त्यांनी दोन हजार रूपयांचं सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकानं बॅंकांना दिले नसल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या माहितीप्रमाणे बॅंकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही, असंही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी,एका अहवालात देशातील लाख हजार एटीएममधून हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी इंडियन बॅंकेने देशभरातील आपल्या हजार एटीएममधून हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहक केवळ हजार रूपयांचे सुटे करून घेण्यासाठी बॅंकांमध्ये येत असतात. त्यामुळे बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, असं बॅंकेककडून सांगण्यात आलं होतं.