मुंबई – महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सत्तास्थापनेचा पेच काही केल्या सुटत नव्हता, मात्र आज अखेर तो प्रश्न सुटला आहे. आज राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना शपथ दिली. हा शपथविधीचा सोहळा राजभवनात पार पडला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजप आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचो वातावरण पसरल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने सर्व मतभेदांवर मात करत भाजपने आज एक नवा इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली राज्याची यशोगाथा अशीच निरंतर सुरू राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन! https://t.co/JmhLBf8UFw
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 23, 2019