भारत विजयाच्या उंबरठ्यावर
कोलकाता : भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी मा-यासमोर दुस-या डावातही बांगलादेशचा डाव ढेपाळला अाहे. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशची ६ बाद १५२ अशी अवस्था झाली असून डावाने पराभव टाळण्यासाठी बांगलादेशला अजूनही ८९ धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे भारतला डावाने विजय मिळविण्यासाठी आणखी ४ गडी बाद करण्याची आवश्यकता आहे.
That's that from Day 2 as #TeamIndia are now 4 wickets away from victory in the #PinkBallTest
A 4-wkt haul for @ImIshant in the 2nd innings.
Updates – https://t.co/kcGiVn0lZi@Paytm | #INDvBAN pic.twitter.com/kj7azmZYg0
— BCCI (@BCCI) November 23, 2019
दुस-या डावातही ईशांतच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजाची दाणादाण उडताना दिसली. बांगलादेशचे सुरूवातीचे चार फलंदाज अवघ्या १३ धावांवर माघारी परतले. त्यानंतर मुशफिकुर रहीम व महमूदुल्लाहने डाव सावरला पण दुखापतीमुळे महमूदुल्लाह ३९ धावांवर रिटायर्ट हर्ट झाला व बांगलादेशची पडझड झाली. मेहदी हसन १५ व तैजुल ईस्लाम ११ धावांवर बाद झाले. त्यानंतर दुस-या दिवसांचा खेळ थांबला तेव्हा मुशफिकुर रहीम नाबाद ५९ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे.भारताकडून गोलंदाजीत दुस-या डावात ईशांत शर्माने सर्वाधिक ४ गडी बाद केले तर उमेश यादवने २ गडी बाद केले.
दरम्यान, कोलकातामधील ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या दुस-या व पहिल्या दिवस-रात्र सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने ९ बाद ३४७ वर पहिला डाव घोषित करत २४१ धावांची आघाडी घेतली होती. यामध्ये विराट १३६, पूजारा ५५ आणि रहाणेच्या ५१ धावांच्या खेळीचा समावेश आहे.