मुंबई – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे स्पष्ट असले तरी, दुसरीकडे भाजपा व शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आपले संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. जळगावमधील अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता. तर साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी शिवसेनाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडील आमदारांची संख्या ६३ वर पोहचली आहे.