मुंबई – मुरुड तालुक्यांतील कोरई किल्यावर महाळुंगे गावातील तरुणांनी दिपउत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ला नव्हे तर पंचक्रोशी दुमदुमून निघाली होती. यावेळी गडावरील संपूर्ण भारावलेले वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
ठिकठिकाणी फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. किल्यावर फुलांची आरास करण्यात आली होती. पहाटेच्या प्रहरीच परिसरातील तरुणांनी दीप प्रज्वलित केले. यावेळी कोरई किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता. पोर्तुगिजांचा या किल्यावर वावर असलेल्याचे खुप पुरावे या किल्ल्यावर आजही दिसून येतात. या किल्याच्या एका बाजूला कुंडलीका खाडी तर दुसऱ्या बाजुला अरबी समुद्र दिसून येतो.