मुंबई : देशभरात काल लक्ष्मीपूजन जल्लोषात साजरे करण्यात आले. दोन वर्षांनंतरची दिवाळी देशवासीयांनी दणक्यात साजरी केली. तर दुसरीकडे दिवाळीतील फटाक्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार काही मुस्लीम व्यक्तींनी मुंबई पोलिसांकडे केली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हिंदूंनी एकटवण्याचे आवाहन केले आहे तर अमेय खोपकर यांनी जर त्रास होत असेल तर देश सोडून निघून जा असे सुनावले आहे. ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती.
मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअऱ केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.“विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे,” असे ते म्हणाले आहेत.
“ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात राहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा,” असे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे.
ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 25, 2022
सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे ४.३० वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यता आल्यासे सांगितले होते.