मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटत नव्हता, मात्र शनिवारी सकाळी भाजपने अजित पवारांना बरोबर घेऊन सत्तास्थापन करून राजकीय भूकंप घडवला. अजित पवारांना सोबत घेऊन केलेल्या भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आशिष शेलार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
Ashish Shelar, BJP: We will follow whatever the Supreme Court says but the Governor has given us time till 30th November, we will prove majority with 170 MLAs or more than that. #Maharashtra pic.twitter.com/OMvVnHDdOx
— ANI (@ANI) November 24, 2019
माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. परंतु, बहुमत सिद्ध करण्यसाठी राज्यपालांनी आम्हाला ३० नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. आम्ही १७० आमदार किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन आमचे बहुमत सिद्ध करून दाखवू.” असे, ते म्हणाले.
दरम्यान, या याचिकेवर आज सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे. या २४ तासांच्या आत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत. तर राज्य सरकारच्या वतीनं अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल हे बाजू मांडणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या घडामोडी आधी दोघांची भेट महत्वाची ठरणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.