वडगाव मावळ (प्रतिनिधी) – शिरोता व वडगाव मावळ वनपरिक्षेत्र हद्दीतील विविध ठिकाणच्या पाणवठ्यावर टँकरने पाणी पुरवठाकेला जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यजीवांची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मावळ तालुक्यात हजारो हेक्टर वनक्षेत्र असून वन व वन्यजीव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. एप्रिल-मे तीव्र उन्हाळा असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. वन्यजीवांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू होते. प्रसंगी वन्यजीवांवर हल्ला तसेच रेल्वे व महामार्गावर अपघात होऊन मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ होत आहे.
वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या च्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रमाणे शिरोता वनपरिक्षेत्र हद्दीत टँकर ने वन्यजीवांसाठी बनविलेल्या पाणवठ्यामध्ये पाणी सोडले जात आहे. त्यामुळे वन्यजीवांची पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.