अभिनेता अक्षय कुमार अॅक्शन आणि कॉमेडी हिरो म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात त्याची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढताना दिसत आहे. केवळ भारतातच नाही तर कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही अक्षयचे चाहते आहेत. परदेशातही चाहत्यांना अभिनेत्याचे चित्रपट पाहायला आवडतात.
सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो संपूर्ण टीमसोबत जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मीडिया मुलाखतीत अक्षय कुमारने त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावर खुलेपणाने भाष्य केले. अक्षयसाठी भारतच सर्वस्व आहे, त्यामुळे तो कॅनडाचे नागरिकत्व सोडणार असल्याचे अक्षयने सांगितले.
कॅनडाच्या नावाने लोक त्याला टोमणे मारतात आणि कठोरपणे बोलतात तेव्हा त्याला खूप वाईट वाटते, असे अक्षय कुमारने सांगितले. वृत्त वाहिनीशी बोलतांना अक्षय कुमार म्हणाला, “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावले आहे, ते मी इथे राहून कमावले आहे. आणि मला परत देण्याची संधी मिळाली हे मी भाग्यवान समजतो. मला वाटते. वाईट. जेव्हा लोक माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह लावतात. त्यांना कशाचीही माहिती नसते. फक्त गोष्टी बनवतात.”
अक्षय कुमार पुढे म्हणाला, “मला वाटले,. माझे चित्रपट का चालत नाहीये आणि मला काम करत राहायचे आहे. मी काम करण्यासाठी कॅनडाला गेलो होतो. कॅनडामध्ये माझा एक मित्र होता. त्याने मला इथे येऊन हे काम करायला सांगितले. “यावेळी मी कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. माझ्याकडे फक्त दोनच चित्रपट शिल्लक होते जे अजून रिलीज व्हायचे होते. आणि बाकीचे दोन्ही चित्रपट माझे सुपरहिट ठरले हे माझे भाग्य आहे.
माझा मित्र म्हणाला, आता तू परत जा. पुन्हा कामाला लाग. मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि त्यानंतर मी थांबलो नाही. काम करत गेले. माझ्याकडे कॅनेडियन पासपोर्टही आहे हे मी विसरलो. हा पासपोर्ट बदलून घ्यावा असे मला कधीच वाटले नाही. पण आता मी अर्ज केला आहे. माझा पासपोर्ट बदलल्यानंतर तो लवकरच परत केला जाईल.”