मुंबई – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, अजित पवार काल रात्री आमच्याबरोबर होते. पण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवत नव्हते. हे शरद पवार साहेबांच्या लक्षात येत होते. ते अचानक बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. वकिलाकडे बसले होते असे सांगण्यात आले. शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात वातावरण निर्माण झाले. तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला. तेव्हात त्यांच्या मनात काळबेरे असल्याचे लक्षात आले होते.
ते पुढे म्हणाले, अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवारांची जागा ऑर्थर रोड जेलमध्ये असल्याचे म्हटले होते. दबाव आणून अजित पवार आणि काही आमदारांना फोडले, असेही ते म्हणाले.
Sanjay Raut,Shiv Sena: Kal 9 baje tak ye mahashaye(Ajit Pawar) hamare saath baithe the, achanak se ghayab ho gaye baad mein, vo nazar se nazar mila kar baat nahi kar rahe the, us se hume shaq bhi hua tha pic.twitter.com/l1kzrs1X8D
— ANI (@ANI) November 23, 2019
राज्यपालांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले कि, हा राजभवनाचा गैरप्रकार आहे. रात्रीच्या अंधारात पाप होते. चोरून डाका घातला जातो. राज्याचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताय मग दिवसाढवळ्या का घेतली नाही. तुम्ही पाप केलंय, तुम्ही चोरी केलेय, तुम्ही डाका घातलाय, जनतेला फसवलंय, याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच शिवसेना खंबीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज भेटतील. या वयात शरद पवारांसारख्या मोठ्या नेताला दगा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. हे सर्व पडद्यामागून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून करण्यात आलं आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
WATCH: Shiv Sena’s Sanjay Raut addresses the media in Mumbai https://t.co/x25iBkbDnP
— ANI (@ANI) November 23, 2019