मुंबई – “संजय राऊत यांनी आता तरी शांत रहावे, त्यांनी शिवसेनेचा नाश केला आहे”, अशा शब्दांमध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार यांना शपथ दिली.
Chandrakant Patil, Maharashtra BJP President: Sanjay Raut should now at least keep silent. He has ruined Shiv Sena. pic.twitter.com/6G6W3q290B
— ANI (@ANI) November 23, 2019
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला. भाजपचे 161 आमदार निवडून आले. मात्र, शिवसेनेने जनादेशाचा विश्वासघात केला. पहिल्या पत्रकार परिषदेपासूनच त्यांनी इतर पर्यायांविषयी बोलण्यास सुरूवात केली होती, असा घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला आहे.
Chandrakant Patil, Maharashtra BJP President: Voters had voted for BJP-Shiv Sena alliance and we got 161 MLAs, but Shiv Sena betrayed the mandate. Since the first press conference they had started talking about alternatives. pic.twitter.com/Lus9Y24qC8
— ANI (@ANI) November 23, 2019
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच अखेर आज सुटला आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलीच टिका केली आहे.