मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमड घडामोडीत अखेर भाजपची सरशी झाल्याचे दिसत आहे. कारण एका रात्रीतून राज्यातील राजकारणात मोठा ट्विट तयार झाला आहे. दरम्यान, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा या निर्णयाला पाठिंबा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar: Ajit Pawar’s decision to support the BJP to form the Maharashtra Government is his personal decision and not that of the Nationalist Congress Party (NCP).
We place on record that we do not support or endorse this decision of his. pic.twitter.com/9WvYLItL7X— ANI (@ANI) November 23, 2019
दरम्यान, राज्यातील राजकारण घडलेल्या मोठ्या घडामोडीवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अजित पवार यांनी जो निर्णय घेतला त्याविषयी आपल्याला काहीही कल्पना नाही तसेच हा निर्णय अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे राज्यात घडलेल्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.