नवी दिल्ली – देशभरात करोनाचा फैलाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी २१ दिवस लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनेनेही ३ मेपर्यंत प्रवासी गाड्या रद्द केल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भारतीय विमान कंपन्यांनीही मोठा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ३ मेपर्यंत रद्द केले आहे. दरम्यान, १५ एप्रिलपासूनची विमानांची तिकीट विक्री करण्यात आली होती. मात्र, आता ३ मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
All domestic and international scheduled airline operations shall remain suspended till 11.59 pm, 3rd May: Ministry of Civil Aviation pic.twitter.com/dJaOJfVMzJ
— ANI (@ANI) April 14, 2020