नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका करणारे ट्विट केले. या कठीण प्रसंगात सरकारने गरिबांना वाऱ्यावर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली.
पी. चिदंबरम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची गरज आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही या निर्णयाला पाठिंबा देतो. पण मुख्यमंत्र्यांनी आर्थिक निधी देण्याच्या केलेल्या मागणीवर अद्याप काहीच प्रतिसाद आलेला नाही. या संदर्भात २५ मार्चला जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये एका रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. रघुराम राजन यांच्यापासून जीन ड्रेझ आणि प्रभात पटनाईक यांच्यापासून अभिजित बॅनर्जी या सर्वांनी दिलेले सल्ले निरुपयोगी ठरले.
But beyond the lockdown, what was ‘new’ in PM’s new year message?
It is obvious that livelihood for the poor — their survival — is not among the priorities of the government.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 14, 2020
लॉकडाऊनचे आधीचे २१ दिवस आणि आता नवे १९ दिवस या सर्वांमध्ये देशातील गरिबांना वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यांना जेवणही मिळत नाही. सरकारकडे पैसे आहेत आणि धान्यही. पण सरकार या दोन्ही गोष्टी पुरवतच नाही. देशाच्या सद्यस्थितीबद्दल वाईट वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.