Maharashtra – राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे अशात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्यामुळे आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशात मंत्रिमंडळाचा विस्तारावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. अजून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच संदर्भात आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar )यांनी माध्यमांशी बोलताना एक दावा केला आहे.
मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार ( vijay wadettiwar ) म्हणाले की, ‘हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे समोर आले आहे. आता हसन मुश्रीफ यांना एक मिनिट ही मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मंत्री सरकारमध्ये कसा राहू शकतो? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. असे वडेट्टीवार म्हणाले.’
तत्पूर्वी, खातेवाटपाचा तिढा हा सोडवला गेला असून लवकरच मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, त्याचबरोबर कोणताही विलंब न करा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरात लवकर पार पाडला जाईल, मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असं फडणवीसांनी सांगितले होते.