मुंबई – महाराष्ट्रात यशस्वी सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आता आपला मोर्चा गोव्याकडे वळविला आहे. लवकरच गोव्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, गोव्यात सध्या भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत.
संजय राऊत म्हणाले कि, गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करत भाजपा सरकार घालवणार आहे. गोव्यात ज्याप्रकारे सरकार उभे केले ते सर्वांना माहित असून ते आमच्यावर टीका करत आहेत, असेही त्यांनी भाजपला सुनावले.
Sanjay Raut, Shiv Sena: It will happen across the country. After Maharashtra it is Goa, then we will go to other states. We want to make a non-BJP political front in this country. https://t.co/eKYHS1gAsA
— ANI (@ANI) November 29, 2019
ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्याच्या भुमिकेतून बाहेर पडणे गरजेचे असून उत्तम विरोधक म्हणून काम करतील अशी अपेक्षा आहे. याआधीच्या विरोधी नेत्यांनी केलेल्या कामाचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा, असा सल्लाही संजय राऊतांनी फडणवीसांना दिला.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली चर्चा गोपनीय असते. पहिल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावंर चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांसंबंधी चर्चा सुरु असून उद्धव ठाकरे दोन दिवसांत त्याचा पूर्ण अभ्यास करतील आणि निर्णय घोषित करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.