मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेचा वाद हा सध्या राजकीय वर्तुळातील एकमेव प्रश्न बनला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार यांनी केलेली वक्तव्ये राजकीय सस्पेन्स वाढवणारी ठरली आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनी संवाद साधताना वक्तव्य केले की,’मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपद याविषयी काहीही ठरलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून याबाबत चर्चा करतील आणि काय तो निर्णय घेतील. मात्र यापूर्वी केलेल्या महाशिवआघाडीचे सरकार आल्यास शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात येईल, यावर भाष्य करण्याचं नवाब मलिक यांनी टाळलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.