नवी दिल्ली – ट्विटर ही सोशल मिडीया साईट पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काही महत्वाच्या विरोधी पक्ष नेत्यांची खाती ट्विटरने तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहेत, त्यांची ही कृती म्हणजे देशाच्या राजकारणातील हस्तक्षेप आहे असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या लक्षावधी फॉलोअर्सना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण त्यांचा तो अधिकारच हिराऊन घेऊन ट्विटरने देशातील लोकशाहीं प्रक्रियेवरच हल्ल केला आहे.
जी कंपनी सरकारच्या प्रभावाखाली आहे आणि ती जर आपल्याला राजकारण कसे करायचे याचे धडे घालून देत असेल तर अशी कंपनी चालू ठेवायची काय याचा विचार करण्याची वेळ आली आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ट्विटर आता न्युट्रल राहिलेली नाही आपल्याला राजकारणाचे धडे देऊन ही कंपनी भारतात आपला व्यवसाय करीत आहे आणि देशातील एक राजकारणी म्हणून त्यांची ही भूमिका आपल्याला आवडलेली नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ट्विटरने राहुल गांधी यांचे अकाऊंट बंद करून राहुल गांधी यांच्यावर नव्हे तर देशाच्या राजकीय संरचनेवरच हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांचे अकाऊंट बंद करून माझ्या 19 ते 20 दशलक्ष फॉलोअर्सना त्यांचा लोकशाहीचा हक्क तुम्ही डावलला आहे असा आरोपहीं राहुल गांधी यांनी ट्विटवर केला आहे.
एक व्हिडीओ संदेश जारी करून राहुल गांधी यांनी ट्विटरवर हे आरोप केले आहेत. आपल्याला आपल्या राजकारणाची व्याख्या निश्चीत करण्याचा अधिकार आहे की नाही हा खरा मुळ प्रश्न आहे.
त्यांनी आपल्याला राजकारणाची धडे देण्याची आवश्यकता आहे काय आणि त्यांना हा आपल्या राजकारणातील हस्तक्षेप आपण करू द्यायचा काय असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्या ट्विटरवरील एका पोस्टवरून तक्रार केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचे अकाऊंट तात्तपुरते बंद केले आहे.
दिल्लीत एका बालिकेवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी राहुूल गांधी यांनी सदर बालिकेच्या आईवडिलांचे त्यांना भेटून सांत्वन केले होते.त्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता.
पण अत्याचारीत बालिकेची ओळख त्यामुळे उघड होत असल्याची तक्रार सरकारने ट्विटरकडे केल्याने ट्विटरने राहुल गांधी यांचे ट्विटर अकौंट तात्पुरते बंद केले होते.