Guyana : सूर्यकुमार यादवच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाचे पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20षटकांत पाच बाद 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 17.5 षटकांत तीन गडी गमावून 164 धावा करून सामना जिंकला.
भारताकङून फलंदाजीत सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत सर्वाधिक 83 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्यानंतर तिलक वर्माने 37 चेंङूत नाबाद 49 तर हार्दिक पंङ्याने 15 चेंङूत नाबाद 20 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
यशस्वी जैस्वाल दोन चेंडूत एक धाव काढून बाद झाला तर शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 11 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने फक्त सहा धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने पाच गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाकङून फलंदाजीत ब्रेंडन किंगने 42 आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाबाद 40 धावा केल्या. या दोघांशिवाय मेयर्सने 25 आणि पूरणने 20 धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.