मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय.बी.सेंटर येथे “लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना तर अक्षरशः अश्रु अनावर झाले.
अशात आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे “शरद पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?” ; असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिला आहे.