मुंबई – देशात करोना व्हायरसने हातपाय पसरताच मुंबईच्या धमन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्याचा निर्णय रेल्वे सरकारने घेतला आहे. मात्र, सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पण लोकल सुरु नसल्याने सर्व ताण एसटीवर पडत आहे. यामुळे केंद्राने लोकल रेल्वे सुरू करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
अनिल परब म्हणाले कि, रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्याशी आम्ही संपर्क साधत आहोत. किमान अत्यावश्यक सेवेत येणारे जे लोक आहेत, मग त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय आहेत सोबतच इतरांना आणण्यासाठी तरी आम्हाला रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना एसटीने प्रवास करणं कठीण होत लोकल सुरु केल्यास त्यांच्यावरील ताण कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.