पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून मधून ११ उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांनी बाद करण्यात आले.
त्यामुळे शिरुरमधून 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पुण्यातून सर्व ४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सोमवारी (२९ एप्रिल) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे.
शिरूरमधून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपक्ष ११ उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव अवैध ठरविण्यात आले, तर ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुणे मतदारसंघातून ४२ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यापैकी केवळ मोनिका मुरलीधर मोहोळ यांचा एक अर्ज पक्षाचा एबी अर्ज न जोडल्याने बाद करण्यात आला, त्यांचे उर्वरित अर्ज अपक्ष म्हणून कायम राहिले.
त्यामुळे पुण्यातून ४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना अर्ज माघारीची मुदत सोमवारी (२९ एप्रिल) दुपारी तीनपर्यंत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी पुणे व शिरुर मतदारसंघाचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.