मुंबई – भारतीय हवामान विभागाकडून 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात व दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 3 नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापुरात 3 नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
30 Oct, 📢
1 – 3 नोव्हेंबरला राज्यात; दक्षिण कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात व दक्षिण मराठवाड्याच्या
काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. @RMC_Mumbai
– IMD pic.twitter.com/tNOjS46Vnu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 30, 2021
1 ते 2 नोव्हेंबरला राज्यात दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जने सह पावसाची शक्यता आहे. 3 नोव्हेंबरला नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
4 ते 10 नोव्हेंबरला द-पू बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून ते जास्त तीव्र न होता पश्चिमेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. 6-11 नोव्हेंबर दरम्यान ह्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यात असून काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.