दुबई : भारतीय खेळाडूंना विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांतच पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा दारुण पराभव पत्करावा लागला. यावरून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय खेळाडूंना फटकारलं.
भारतीय संघाच्या पराभवानंतर शोएबने नाराजी व्यक्त करत भारतीय खेळाडूंना खोचकरित्या ‘तुम्हाला मैदानावर क्रिकेट खेळायचं आहे की इन्स्टाग्रामवर?’ असा सवाल विचारला आहे. मागील काही काळापासून सोशल मीडिया आणि जाहीरातींमध्ये भारतीय क्रिकेटपटू अधिक वेळ घालवत असल्याचे दिसून येत असल्याने त्यावरुनच शोएबने ही टीका केली असावी, असा अंदाज आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 110 धावा पर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तर न्यूझीलंडने 14.3 षटकांत 2 बाद 111 धावा करून विजयाची नोंद केली.
या सामन्यात आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरेल. तर गोलंदाजीतही भारतीय संघाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही.