कोची – केरळातील कॉंग्रेस पक्षाच्या कोणाशीही आपला वाद नाहीं किंवा आपण कोणावरही नाराज किंवा रागावलेलो नाही असे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. आपण पक्षातील कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत, कोणाशी बोलणे टाळण्याचा विषयच उद्भवत नाही कारण आम्ही कोणीहीं बालवाडीत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची खिल्ली
ऑल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते कोचीत आले असता तेथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले कीे, त्यांनी पक्षातील कोणाच्याही विरोधात वक्तव्य केलेले नाही किंवा आपण पक्षाच्या निर्देशांविरुद्ध कृती केलेली नाही. परंतु तरीही केरळ प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांना आपल्या वागण्या विषयी आक्षेप का निर्माण झाला याची आपल्याला कल्पना नाही असे ते म्हणाले.
भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची खिल्ली
तथापि माझ्या बाजुने कोणाविषयीही तक्रार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. थरूर यांची प्रदेश कॉंग्रेसची अनुमती न घेताच केरळात संपर्क मोहींम सुरू केली होती. त्याला केरळ प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे थरूर व प्रदेश कॉंग्रेस नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.