सूरत – भारतीय जनता पक्ष आता व्हिडीओ बनवणारी कंपनी बनला आहे. आता आपल्याला व्हिडीओ बनवणारी कंपनी हवी आहे की चांगले सरकार चालवणारा राजकीय पक्ष हवा आहे याचा विचार जनतेने करायचा आहे असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्ली व गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काही व्हिडीओ जारी करून आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे त्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी भाजपची अशी खिल्ली उडवली आहे.
#video : ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी लुटला बाईक चालवण्याचा आनंद
गुजरात मध्ये केजरीवाल यांच्या जोरात प्रचार सभा सुरू आहेत. येथील सभेत बोलताना ते म्हणाले की गुजरातमधील सामान्य माणूस आज दहशतीत आहे. तो कोणत्या राजकीय पक्षाला मतदान करणार आहे हे आज तो जाहीरपणे बोलूही शकत नाही. तुम्ही येथील कोणत्याही माणसाशी संपर्क साधून त्याच्याशी पाच मिनीटे बोला, तो आवर्जून सांगेल की मी भाजपला मतदान करणार असलो तरी माझ्या भागातील सर्वच नागरीकांनी आम आदमी पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
#video : ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी लुटला बाईक चालवण्याचा आनंद
तो आज स्वत:ही आम आदमी पक्षालाच मतदान करू इच्छितो पण तसे जाहीर बोलण्याची त्याची आज हिंमत होत नाही. हे दहशतीचे वातावरण दूर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. गुजरातच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नाव कोणीच घेताना दिसत नाही असे ते म्हणाले.गुजरात मध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आले तर 31 जानेवारीच्या आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.