वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील व माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांच्या परिवाराने पूरग्रस्तांसाठी लाखमोलाची मदत करून एक आदर्श उभा केला आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या राव लक्ष्मी फाऊंडेशनला गहू व तांदूळ भेट दिला आहे. तर माहेर संस्थेला देखील अन्नधान्याचे याचप्रमाणे वाटप केले आहे. अमृत बहुद्देशीय संस्था यांनादेखील सातव पाटील परिवाराच्यावतीने धान्याचे वाटप करून लाखमोलाची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
याबाबत माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की कोकण परिसरामधील पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याने शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राव लक्ष्मी फाउंडेशन ला अन्नधान्याची मदत करण्यात आली आहे.
हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी, व चंदननगर खराडी परिसरातील देखील सामाजिक संस्थेला मदत करण्यात आली आहे. यापुढील काळात देखील सामाजिक जाणीव ठेवून मदतीचा ओघ सुरूच ठेवणार असल्याचे जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.