शिरूर-अतिवृष्टीमुळे कोकणाला मोठा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी लोकांचे संसार उघड्यावर आले. कोकणातील अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी शिरुर हवेलीचे आमदार आमदार ऍड.अशोकबापू पवार व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता अशोक पवार (भाभी) यांच्या रावलक्ष्मी फाउंडेशनने ‘एक हात मदतीचा’ हे आवाहन केले होते.
सामाजिक भावनेतून केलेल्या या आवाहनाला उदंड प्रतिसाद लाभला असून अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी 49 संसारोपयोगी वस्तूंसह दहा हजार किट 27 ट्रक व टेम्पो गाड्यांच्या ताफ्यासह रवाना करण्यात आले आहेत.
रावलक्ष्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेली ही मदत अतिशय मोलाची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वस्व हरवलेल्या कुटुंबांना पुन्हा नव्या जोमाने उभा राहण्यासाठी याची मदत होणार आहे.