नवी दिल्ली : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७ हजारांवर पोहचला आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
1,396 new cases & 48 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/k4SeH9B9Z0
— ANI (@ANI) April 27, 2020
आरोग्य विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत २७ हजार ८९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामधील २० हजार ८३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६ हजार १८५ रुग्णांना उपचारा नंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत १ हजार ३९६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४८ रुगांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे चर्चा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन आहे. देशामध्ये सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे.