पुणे – शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून अजित पवार (Ajit pawar) भाजपसोबत (Bjp) गेले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्तेत सामील झाले. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णतः बदललं. या पूर्वी राज्यात शिवसेनेमध्ये पडलेली फूट सर्वांनी पाहिली होती त्यानंतर अजित पवारांनी देखील शरद पवारांची साथ सोडत पक्षावर दावा सांगितला. अशात आता शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार यांच्या गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे.
अजित पवारांकडे गेलेल्या आमदारासोबत माझी चर्चा झाली आहे. त्यांनी मला त्यांची भूमिका सांगितली आहे. ते म्हणाले की, आम्ही मनापासून शरद पवारांसोबत आहोत. आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे थांबलो आहोत असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. (ncp split)
खरी परिस्थिती वेगळी आहे. जसं दिसतं तसं नसत ते लोक आमच्यासोबत आहेत असं देखील पाटील यावेळी म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत जयंत पाटील यांनी विविध राजकीय गोष्टींवर भाष्य केलं.राज्यातील लहानग पोरग सुद्धा सध्या शरद पवारांचं सरकार पुन्हा येणार असल्याचे सांगत आहे असंही पाटील यावेळी बोलताना म्हणाले. (jayant patil on sharad pawar group)
देशात महागाई, बेरीजगारीसारखे मुद्दे आहेत. याकडे सरकारचं लक्ष नाही. मणिपूर हिंसाचारावर हे बोलत नाहीत.सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय पक्षांना तोडण्याचं काम सध्या केलं जात आहे. या सरकारचा फक्त सहा महिन्यांचा खेळ उरला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलणार आहे असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.