Rahul Gandhi| लोकसभा निवडणुकीतील पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराला वेग आला आहे. यात विविध पक्षाकडून मोठे दावे करण्यात आले. यातच आता काँग्रेसने त्यांचे सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळेल आणि कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारासाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही, आश्वसान दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हवाला देत काँग्रेस महिलांकडून मंगळसूत्रही हिसकावून घेईल आणि घुसखोरांमध्ये वाटेल, असे म्हंटले होते. यावरून विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
महंगाई और बेरोज़गारी का चरम झेल रहे भारत में आज हर साल 6 करोड़ से अधिक लोगों को मात्र एक ‘मेडिकल बिल’ गरीबी की खाई में धकेल देता है।
महंगे इलाज, महंगी जांच और महंगी दवाइयों की वजह से आम आदमी उधारी और ब्याज के ऐसे चक्र में फंस जाता है जहां से बाहर निकलने में उसे वर्षों लग जाते… pic.twitter.com/gO5lTkXYNQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 29, 2024
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपले निवडणूक आश्वासन सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, महागाई आणि बेरोजगारीच्या शिखरावर असलेल्या भारतात दरवर्षी 6 कोटींहून अधिक लोकांना गरिबीच्या खाईत ढकलत आहे. महागडे उपचार, महागड्या चाचण्या आणि महागडी औषधे यामुळे सर्वसामान्य माणूस कर्ज आणि व्याजाच्या चक्रात अडकत आहे. ज्यातून बाहेर पडण्यासाठी वर्षानुवर्षे लागत आहेत.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही प्रत्येक भारतीयाला २५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देऊन असुरक्षिततेच्या या चक्रातून बाहेर काढू, असा आमचा संकल्प आहे. आता भारतातील कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारांसाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळसूत्राच्या टीकेवरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आता चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. “इंदिरा गांधींनी युद्ध झालं तेव्हा त्यांचं सोनं या देशाला दिलं. माझ्या आईचं मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झालं आहे. . काँग्रेस पक्ष तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही असं मोदी म्हणतात. ७० वर्षांपासून देश स्वतंत्र आहे. त्यातल्या ५५ ते साठ वर्षांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. कधी कुठल्या स्त्रीचं मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचं उदाहरण आहे का?” असा सवाल प्रियांका गांधींनी केला होता
हेही वाचा:
भारत दौऱ्याऐवजी एलॉन मस्क यांनी गाठले थेट चीन; काय आहे यामागचं कारण?