Chhagan Bhujbal | Sharad Pawar | Uddhav Thackeray – उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कले होते.
आता मात्र त्यांनी यावरून यू-टर्न घेतला आहे. सहानुभूतीची लाट वगैरे मी म्हणालो नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. भुजबळ म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी लोकांच्या मनात सहानुभूतीची लाट आहे, असे मी म्हणालेलो नाही.
या दोन्ही नेत्यांचे पक्ष फुटले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये त्यांच्याप्रती सहानुभूती आहे, असे मी म्हणालो होतो. परंतु, शेवटी देशपातळीवर, देशाच्या बाहेरही पंतप्रधान मोदींचे खमक नेतृत्त्व आहे. त्यामुळे जेव्हा मतदानाची वेळ येते, तेव्हा लोकं सहानुभूती बाजूला ठेऊन, नेतृत्वाला मतदान करतात, असे ते म्हणाले.