खालापूर – इर्शालवाडीतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. बचावलेल्या लोकांच्या पूर्नवसन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत आणि सर्व मंत्रीमंडळ प्रयत्नशील असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे 19 जुलै रोजी दरड कोसळल्याने अनेकांची घरे गाडली गेली. बचावलेल्या लोकांसाठी तात्पुरता निवाऱ्याची सोय शासनाने केली आहे. दुर्घटनेत आईवडील मृत्यु पावलेल्या अनाथ मुलांना अनाथ प्रमाण पत्रक तसेच आर्शिवाद योजनेतून 16 मुलांना हेल्थकार्ड, मिठाईचे वाटप आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच उमा मुंडे, संतोष बैलमारे, रितू ठोंबरे, विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, प्रांताधिकारी अजित नैराले, तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसिलदार सुधाकर राठोड, राष्ट्रवादीचे अंकीत साखरे, सुहिता ओव्हाळ, डॉ. जितेंद्र हरियान, डॉ. गीता मखिजा, डॉ. निधी शाह, डॉ. वर्शिल शाह, डॉ. रुची जैन, डॉ. विधी गावकर, डॉ.सचिन नायर आदी उपस्थित होते.
तर जस्ट लोक हॉस्पिटलच्या माध्यमातून मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून 21 वर्षापर्यत मोफत उपचारासाठी आशीर्वाद योजना कार्ड देण्यात आले आहे. दुर्घटनेत बचावलेल्या मुलांच्या भविष्यासाठी महिला बालविकास विभाग पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. बाधितांच्या पुर्नवसनासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री प्रयत्नशील असल्याची ग्वाही देखील आदिती तटकरे यांनी दिली.