मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. मात्र “कृषीमंत्र्यांच्याच मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करतायत”, अजित पवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी देखील सरकारवर टीका केली.
राज्यातील सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी चालू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी आजच्या अधिवेशनात केला. तसेच विधानसभा अध्यक्षांनी सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांची मागणी फेटाळली. आम्ही मोठी मदत केल्याचं खोटं रेटून बोलणं ही सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप भाजपाचं सरकार करतंय असा आरोप नाना पटोले यांनी केला.