success story of sports person । आपण स्वप्न बघतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनतही घेतो. स्वप्न पूर्ण करण्याच्या या प्रवासात नेहमी आपल्या अनेक अडथळे येतात. त्यावेळी आपण कारण देत ते स्वप्न पूर्ण झाले नाही असं म्हणत माघार घेतो. मात्र अनेक अडचणींवर मात करत जो जिद्दीने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी हार न मानता काम करत असतो तो नक्कीच यशस्वी होतो. असाच एक जीवन संघर्षाचा प्रवास आज आम्ही सांगणार आहोत. हि गोष्ट आहे, सुयश जाधवची…
View this post on Instagram
सुयश हा बारा वर्षाचा असतांना एके दिवशी एका कार्यक्रमात त्याला विजेचा झटका बसला, या दुर्घटनेत त्याला त्याचे दोन्ही हात गमवावे लागले. सुयशचे वडील नारायण जाधव हे क्रीडाशिक्षक होते. त्यांना लेकाला एक आंतराराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते. मात्र दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गेल्याने त्यांना आपले आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले. सुयश जाधव याचे वडील नारायण जाधव हे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजलेले होते. त्यांनी राज्यात व देशात अनेक पुरस्कार मिळविले. मात्र परिस्थितीमुळे त्यांना यात करिअर करता आले नाही आणि ते वेळापूर येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले.
यावेळी त्यांचा लाडका मुलगा सुयशलाही चांगला जलतरणपटू बनवून त्याला देश विदेशात खेळण्यासाठी सारे सोयी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न त्यांनी पहिले. मात्र नियतीला हे मान्य नव्हते आणि 2004 साली विजेचा झटका बसून सुशांतचे दोन्ही हात कापावे लागले. आता पोहणे सोडा पण त्याने जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना एकदा हात गमावल्यावर त्याला सफाईदारपणे पोहताना वडिलांनी पहिले आणि त्याचेवर मेहनत घेण्यास सुरुवात केली. वडिलांच्या या स्वप्नांची जाणीव सुयशला होती. सुयशने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द बाळगली आणि त्याच्या या प्रवासाला सुरुवात केली. आणि त्याने जलतरण स्पर्धेत अनेक किताब आपल्या नावे केली.
राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार असो, एकलव्य पुरस्कार असो सुयश एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके मिळवत गेला. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केली आहे. 2016 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिला होता. हू त्याची सर्व कामगिरी पाहून भारत सरकारने सुयशाला यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर करीत त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे. पॅरा-स्विमर सुयश नारायण जाधव 2020 टोकियो पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय जलतरणपटू ठरला आहे. सुयश टोकियोमध्ये S-7 श्रेणीतील 50 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर वैयक्तिक मेडले SM-7 श्रेणीमध्ये स्पर्धा करताना दिसणार आहे.
दरम्यान, यशाच्या वाटेत आलेल्या संकटनावर मात करत सुयशने उंच भरारी घेतली. अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयशला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. अपंगत्वाचा बाऊ करण्यापेक्षा आपल्यात कोणत्या प्रतिभा आहेत. त्याला वाव दिल्यास जीवनात हमखास यश मिळते, असा संदेश सुयशने माध्यमांशी बोलतांना दिला होता.